प्रतिनिधी गौरव मोहबे
नागभीड जंक्शन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महत्वाचे ठिकाण असून
गोंदिया बल्लारपूर येथे जाण्याकरिता प्रवासी चार गाड्या धावतात मात्र कोरोना काळानंतर काही काळात प्रवासी वाहतूक खा नामदेवराव किरसान साहेब यांनी हा प्रश्न संसदेत उपस्थित केला होता यामुळे काही काळ प्रवासी वाहतूक
पण सुरळीत झाली होती आजमितीला रेल्वे वाहतूक माल वाहतुकीला महत्व देते की काय? यामुळे प्रवासी वाहतूक थांबवून माल वाहतूक जोमात होत असल्याने प्रवासी वाहतूक वेळेवर होत नाही
अनेक स्थानकावर तासनतास बसून राहावे लागत आहे.
यामुळे प्रवाशांनी स्वस्त आणि मस्त वाहतुकीकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे यामुळे रेल्वे वाहतुकीचे नुकसान होत आहे पण प्रवासी वाहतूक सुरू असलेली कोंडी सोडवून जनतेला प्रवासाची नियमित सेवा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.







