चंद्रपूर; जिल्हातील विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्या म्हणून युवा स्वाभिमान पार्टी कडून आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा धडकला. हा मोर्चा युवा स्वाभिमानी पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
या मोर्च्यामध्ये मागण्या खालीलप्रमाणे
१)शेतकर्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसानभरपाई द्यावी,
२)लॉक डाऊन काळातील वीजबिल 50%माफ करावे
३)स्थानिकांना रोजगारा मध्ये प्राधान्य देण्याचे सक्तीने पालन करावे
४)असंगठित कामगारांच्या समस्या तात्काळ सोडवण्यात याव्या
५)अल्ट्राटेक सीमेंट कामगारांच्या समस्या सोडविण्यात याव्या.
६)गोंडपिंपरी येथील पंचायत च्या सफ़ाई कामगारांच्या समस्या सोडविण्यात याव्यात.
७)जिल्ह्यातील खराब रस्ते तात्काळ ठीक करावे
इत्यादी मागण्या घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.