-नितेश खडसे
राज्य सरकारने दिवाळीनंतर २३ तारखेपासून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती ,मात्र मुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत असे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले – तसेच राज्यात सुद्धा शाळा सुरू करणं बंधनकारक नाही, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
● शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून तसेच स्थानिक पातळीत कोरोनाची परिस्थतीत कशी आहे , ते ठरवून शाळा चालू होतील
● तसेच पालकांची संमती घेऊन विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे,असंही बंधनकारक नाही ,शाळा जरी सुरू झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण बंद नसणार
● सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी शाळेत नाही आले तरी त्यांच्या अटेन्डेन्स मार्क्सवर याचा परिणाम होणार नाही असं ही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
● तसेच मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत एकही शाळा सुरू होणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे.