Homeगडचिरोलीचिचडोह बॅरेज प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात येणार नदीलगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा

चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात येणार नदीलगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा

 

गडचिरोली / जिल्हा संपादक प्रशांत शहा

वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेज, ता. चामोर्शी जि.गडचिरोली येथील मा. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग नागपूर यांनी मंजूर केलेल्या व्दार संचलन कार्यक्रमानुसार बॅरेजचे 15.00 मीटर लांबीचे व 9.00 मी. उंचीचे 38 पोलादी दरवाजे बंद करुन पाणीसाठा करण्याचे नियोजित आहे.

दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पासून सर्व दरवाजे व्दार संचलन कार्यक्रमानुसार ( प्रथम नदी काठावरील व क्रमाने नदीच्या मध्यभागातील द्वारे) क्रमा क्रमाने बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नदी पात्रात उर्ध्व बाजूस व नदीत आलेल्या उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होणार आहे आणि नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे. वाढलेल्या पाणीसाठयामुळे जिवीत व वित्त हानी होवू नये म्हणून, सर्व लगतचे गावांना /ग्रामपंचायतींना सुचना देण्यात येते की, त्यांनी आपले गावकऱ्यांना, याबाबत दवंडी द्वारे सुचित करावे व नदी काठावर जाणे टाळण्याच्या तसेच नदीकाठावरिल शेतांमध्ये कामे करतांना सतर्क राहण्याच्या सुचना द्याव्यात. या कार्यालयाकडून ज्या शेतांचे भुसंपादन / सरळ खरेदी करण्यात आलेली आहे व येत आहे. त्या सर्व भुधारकांनी शेतातील कामे करतांना खबरदारी घ्यावी किंवा या कार्यालयाने बुडीत क्षेत्रासाठी संपादीत केलेल्या शेतांमध्ये शेतींची कोणतीही कामे करु नयेत. सर्व मासेमारी करणारे व पशुपालक यांनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये. रेती घाटातून रेती काढणारे आणि नदी पात्रात इतर काम करणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी. अन्यथ: होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. असे उपकार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांनी कळविले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!