Home पुणे सर्वोच्च न्यायालयाला हवा. असणारा डेटा बनविण्यासाठीच्या उच्चस्तरीय समिती ..सात महिन्यांत एकही बैठक...

सर्वोच्च न्यायालयाला हवा. असणारा डेटा बनविण्यासाठीच्या उच्चस्तरीय समिती ..सात महिन्यांत एकही बैठक नाही…?सर्वोच्च न्यायालयात आता पदोन्नतीतील आरक्षण धोक्यात…?

641

चक्रधर मेश्राम (सहसंपादक)

पुणे   :-दलित आदिवासी लोकप्रतिनिधींनो , संविधानिक तरतूदींचे रक्षण करण्यासाठी राजीनामे द्या , आम्ही तुमच्या सोबत आहोत…सर्व दलित – आदिवासी मंत्री व सर्वपक्षीय दलित – आदिवासी आमदार खासदारांनी पदोन्नतीतील आरक्षणासाठी ताबडतोब राजीनामा द्यावा व पदोन्नतीतील आरक्षणास सतत विरोध करणाऱ्या अजित पवारांना व अजित पवारांच्या दादागिरीला बळी पडणाऱ्या मुख्यमंत्री महोदयांना धडा शिकवावा.

पदोन्नतीतील आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता मिळण्यासाठी एससी – एसटी च्या नोकऱ्यांतील ‘ अपूर्ण प्रतिनिधित्वा ‘ inadequate representation चा डेटा जमा करण्यासाठी मुख्य सचिवां च्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीची एकही बैठक समिती स्थापन झाल्या पासून झाली नाही.

२२ मार्च २०२१ ला समिती स्थापन झाली होती व तीने एक महिन्यात रिपोर्ट बनवायचा होता. तें घडले नाही म्हणून २२ जून २०२१ च्या शासन निर्णयाद्वारे त्या समितीला मुदतवाढ देण्यात आली व ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत तिचा कार्यकाळ होता.
ह्या देखील काळात एकही बैठक झालेली नाही असें कळते व आता त्या समितीचा कार्यकाळ देखील संपून गेलेला आहे.
कर्नाटक च्या समितीने असा अहवाल व डेटा फक्त ४४ दिवसांत बनवला होता हें लक्षात घेतलं तर हें स्पष्टच होतं कि महाराष्ट्रातील जातदांडगे महाराष्ट्रात तसं होऊं देतं नाहींत.
अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात ह्या प्रकरणात सुनावणी झाली असून ५ ऑक्टोबर २०२१ हि पुढली तारीख आहे.
लवकरात लवकर जर आवश्यक डेटा महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडला नाही तर दलित – आदिवासी भटके विमुक्त कर्मचारी वर्गाचे पदोन्नतीतील आरक्षण संपुष्टात येईल व सर्व मोक्याच्या जागा मिळण्यापासून दलित आदिवासी भटके वंचीत होतील.

संविधानात कलम १६ ( ४ अ ) मध्ये पदोन्नतीतील आरक्षणाची स्पष्ट तरतूद असतांना देखील जर राजकीय धनदांडगे व जातदांडगे तें होऊ देतं नसतील तर मग दलित आदिवासी मंत्री , आमदार खासदारांना एक मिनिटही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.

त्यांनी आपले राजीनामे अजित पवार व मुख्यमंत्र्यांच्या समोर फेकण्याची वेळ आली आहे. त्यांनी दादा वगैरेंच्या दादागिरीला न डगमगता समाजाचे व समाजाच्या संविधानिक हक्कांचे संरक्षण करायलाच हवे. अशी माहिती डॉ.संजय दाभाडे ,
पुणें , आरक्षण हक्क संरक्षण समिती, यांनी दिली आहे.

Don`t copy text!