राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचे दुःख जाणणारा पक्ष आहे, त्यामुळे बल्लारपूर येथील कुठल्याही भागात मदत देण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचतात, शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी बल्लारपूर येथील कार्यकर्ते नेहमी तत्पर असतात.हेच काम बघता बल्लारपूर तालुक्यातील समाजकार्य करणारे युवक स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पक्ष प्रवेश करण्याचे ठरवले आहेत .
पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती आमदार व चंद्रपूर जिल्ह्यातील निरीक्षक ,श्री.मनोहरराव जी चंद्रिकापुरे, आमदार अमोल दादा मिटकरी,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष श्री. राजेंद्र वैद्य, महिला जिल्हा अध्यक्ष सौ.बेबीताई उईके यांची होती. व बल्लारपूर तालुका अध्यक्ष महादेवजी देवतळे, शहर अध्यक्ष बादल भाऊ उराडे, कार्याध्यक्ष इंजि. राकेश सोमानी यांच्या मार्गदर्शनात व जितेश नंदकुमार पिल्ले व रवी बेज्जला यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश घेण्यात आला. २३० लोकांनी पक्ष प्रवेश केला, या कार्यक्रमात उपस्थित शहर उपाध्यक्ष आरिफ खान, शहर युवक अध्यक्ष रोहन जमगाडे,महिला तालुका अध्यक्ष अफसाना सय्यदजी,शहर अध्यक्ष अर्चना ताई बुटले,अंकीत निवलकर, देवा जी यादव, नासिर बक्ष, व अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये केला भव्य दिव्य पक्ष प्रवेश
RELATED ARTICLES