HomeBreaking Newsचंद्रपुर; गेल्या २४ तासात २८५ जणांनी केली कोरोनावर मात, तर दोन कोरोनाबाधितांचा...

चंद्रपुर; गेल्या २४ तासात २८५ जणांनी केली कोरोनावर मात, तर दोन कोरोनाबाधितांचा मृत्यु

चंद्रपूर:- जिल्ह्यात मागील २४ तासात २८५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली असताना दुसरीकडे १९९ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ९७७ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ९१० झाली आहे. सध्या १ हजार ७८० बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ५४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख १९ हजार ४८६ नमुने निगेटीव्ह आले आहेत. मंगळवारी मृत झालेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलनी येथील २९ वर्षीय पुरूष व माता मंदिर वार्ड वरोरा येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २८७ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २६७ , तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ११, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. नागरिकांनी बाहेर निघतांना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!